ब्रेकिंग न्युज
भाजपा कामगार मोर्चाचा गाव तिथे कामगार मित्र संकल्पना राज्यात अव्वल- खा.प्रितम मुंडेसंविधानाला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर मी आधी रस्त्यावर उतरेल – पंकजाताई मुंडेनिपाणी जवळका येथे दोन दिवस भव्य ज्योतिबा यात्रा उत्सवनिजामकालीन खजाना विहिरीला  दुष्काळाच्या झळा ; पाण्याने तळ गाठला ; संरक्षण व संवर्धनाची गरज :- डॉ.गणेश ढवळेज्ञानराधा बॅकेच्या पैसे अडकलेल्या खातेदाराची गेवराईत बैठक; आंदोलन व गुन्हे दाखल करण्याचा निर्णयतात्यासाहेब मेघारे यांना पी एच .डीप्राप्तपोलिस हवालदार बांगर समवेत अमोल सोनवणे एसीबीच्या ताब्यातबाळराजे पवारांचा राजकीय वारसदार आ.पवारांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या प्रचारार्थ मैदानाततुली रिसर्च सेंटर फॉर इंडिया स्टडीजचे सिनेमॅटिक केमिस्ट्रीचे भव्य प्रदर्शनसहारा अनाथालयातील लेकिंची पाठवणी करताना बालग्राम गहिवरले..!

ग्रामीण भागाच्या विकासासोबत इथली संस्कृती टिकणेही आवश्यक आहे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन  

पुणे: अल्पबचत भवन येथे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस, शरद आदर्श कृषीग्राम, कृषीनिष्ठ शेतकरी, आदर्श गोपालक, उत्कृष्ट पशुवैद्यकीय अधिकारी व शिक्षण विभागातील विजेते स्पर्धक यांचा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभ मंगळवारी पार पडला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामीण भाग हा देशाचा आणि राज्याचा आधार असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. ग्रामीण भागाच्या विकासासोबत इथली संस्कृती टिकणेही आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आपली संस्कृती म्हणजेच जीवन व्यवहार गावामध्ये पहावयास मिळतो. गावांच्या उन्नतीसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. मात्र त्यासोबतच गावातील शेती, जोडधंदे वाढले पाहिजेत. महिला व मुलांसाठी सोयी सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात, असे पाटील म्हणाले.

जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यात १५० कोटींची वाढ करण्यात आली असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत. येत्या एप्रिल पासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तेथील अधिकारी, सरपंच, उपसरपंच यांच्यासमवेत विकासकामांबाबत आढावा बैठक घेणार असल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

शासनातर्फे समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. पुणे जिल्हा परिषद अशा योजना आणि उपक्रमांबाबत राज्यात आघाडीवर आहे. पीकविमा योजना, महिलांना एसटी बसच्या तिकिटात सवलत आदी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, असेही पाटील म्हणाले.

सन २०२० -२१, २०२१-२२ चे कृषिभूषण स्व. अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार, कृषिनिष्ठ व शरद आदर्श कृषिग्राम पुरस्कार, सन २०२१-२२ चे आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षक, सेविका, मदतनीस पुरस्कार, सन २०२२-२३ चे जिल्हास्तरीय कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पुरस्कार, सन २०२१-२२ चे आदर्श गोपालक पुरस्कार, उत्कृष्ट पशुवैद्यकीय पुरस्कार इत्यादी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक शालिनी कडू, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, निर्मला पानसरे, कृषि व पशुसंवर्धन विभागाचे माजी सभापती बाबुराव वायकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काळूराम विधाते आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!