ब्रेकिंग न्युज
घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी 

*शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला बजरंग सोनवणे शेतकऱ्याच्या बांधावर* *धारूर तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची केली पाहणी* ————————————–

 

बीड / वडवणी :-

बीड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी धारूर तालुक्यातील गारपीटग्रस्त भागात बांधावर जाऊन पाहणी करीत शेतकऱ्याचे सांत्वन केले. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील सोनवणे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे हे १४ एप्रिल रोजी धारूर तालुक्यात गारपीटग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते. मागील दोन दिवसापूर्वी प्रचंड गारपिट होऊन शेतातील उभ्या पिकांसह फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बजरंग सोनवणे हे प्रचारातून वेळ काढून थेट बांधावर पोहचले. यावेळी गारपीटग्रस्त शेतकरी बांधवानी आपल्या झालेल्या नुकसानीची व्यथा सोनवणे यांना सांगत मदत मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली झालेले नुकसान पाहून व्यथित झालेल्या बजरंग बप्पानी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी यांनी केली आहे.
यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर आंधळे , शिवसेना उबाठा गटाचे तालुका अध्यक्ष विनायक मुळे , आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष धम्मपाल डावरे , मा ह चे तालुकाध्यक्ष विष्णूजी मुजमुले यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!