ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

……तर ठाकरे सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही”

 

विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले असून सत्ताधारी की विरोधक बाजी मारणार हे सायंकाळी निकालही जाहीर होणार आहे. निकालानंतर कोण जिंकणार, कोण हरणार हे समजणार असून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते तथा केंद्रीयमंत्री रामसाद आठवले यांनी मोठे विधान केले.

“महाविकास आघाडीने दावा केला असला तरी आमचाही दावा आहे की आमच्या सर्व जागा निवडून येतील. निवडणुकीत भाजपचा विजय झाला, तर ठाकरे सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशी टीका आठवलेंनी केली आहे. अकोला येथे आज महापालिकेसह राज्यातील आगामी महापालिका निवडणूका लढणार असल्याची घोषणा केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केली.

यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्हणाले की, आम्हाला अपक्षांचाही पाठिंबा मिळतो आहे. छोट्या मोठ्या पक्षांचाही पाठिंबा मिळतो आहे आणि आमच्याकडे देखील मते आहेत. त्यामुळे भाजपाला राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीत देखील यश मिळणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आमची पाचवी जागा निवडून येईन, असा विश्वास यावेळी मंत्री आठवले यांनी व्यक्त केला आहे. आता सायंकाळी निकालानंतर विधान परिषद निवडणुकीत कोण जिकेलं हे समजणार आहे.

error: Content is protected !!