ब्रेकिंग न्युज
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊत

साहित्याची चळवळ पुढे नेण्यासाठी साहित्यिकांनी एकाच विचाराने प्रेरित व्हायला हवे-संमेलनाध्यक्षा राजश्री बोहरा नवोदित कवी, लेखकांना वृत्तपत्रांनी स्थान द्यावे-आत्मलिंग शेटे

साहित्याची चळवळ पुढे नेण्यासाठी साहित्यिकांनी एकाच विचाराने प्रेरित व्हायला हवे-संमेलनाध्यक्षा राजश्री बोहरा
नवोदित कवी, लेखकांना वृत्तपत्रांनी स्थान द्यावे-आत्मलिंग शेटे
डोंबिवली/मुंबई (प्रतिनिधी)ः- साहित्याची चळवळ पुढे नेण्यासाठी साहित्यिकांनी एकाच विचाराने प्रेरित होऊन विविध साहित्यिक उपक्रम राबवले पाहिजेत. संमेलने भरवून नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवे. असे आवाहन सुप्रसिद्ध साहित्यिक व संमेलन अध्यक्षा सौ. राजश्री बोहरा यांनी 2 रे पी सावळाराम राज्यस्तरीय साहित्य संमेलनात आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
रविवार दिनांक 24 जुलै 2022 रोजी डोंबिवलीच्या सांस्कृतिक भूमीवर 2रे पी सावळाराम राज्यस्तरीय साहित्य संमेलन संपन्न झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश च्या ठाणे जिल्हा विभागाच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक श्री शरद गोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले . समाजात घडणार्‍या घटनांचे वास्तववादी शब्द चित्रण साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून करावयास हवे असे वक्तव्य श्री शरद गोरे यांनी आपल्या भाषणात केले.
तसेच याप्रसंगी विशेष अतिथी परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संपादक, पत्रकार बांधवांनी नवोदित कवी, लेखकांना आपल्या वृत्तपत्रात स्थान द्यावे, त्यांच्या कथा, कवीता प्रकाशित कराव्यात, जेणे करुन त्यांना लिखानासाठी प्रोत्साहन मिळेल, निश्चितच यातूनच मोठे कवी, लेखक बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व या साहित्य संमेलनास शुभेच्छा दिल्या. संमेलनाध्यक्षा सुप्रसिद्ध साहित्यिका हिरकणी राजश्री बोहरा यांनी विशेष अतिथी म्हणून सन्मान दिला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
सुप्रसिद्ध साहित्यिका हिरकणी राजश्री बोहरा यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन पार पडले. तर स्वागताध्यक्ष पदाची धुरा सुप्रसिद्ध साहित्यिका सौ. अनिता गुजर यांनी सांभाळली. आपल्या कुशल नेतृत्व गुणाने या संमेलनाचे आयोजन त्यांनी केले. सुप्रसिद्ध कवी श्री नवनाथ ठाकूर हे कविसंमेलनाचे अध्यक्ष होते. स्थानिक नगरसेवक उद्योगपती श्री बाबाजी पाटील यांनी संमेलनास विशेष उपस्थिती लावली. परळी समाचार चे संपादक श्री आत्मलिंग शेटे उपस्थित होते.
श्री अविनाश ठाकूर, सौ. मुग्धा कुंटे, सौ. राधिका बापट, डॉ मीना बर्दापूरकर या ठाणे जिल्हा कार्यकारिणीने संमेलनाचे उत्तम आयोजन व नियोजन केले होते. श्री प्रतिक नागोळकर, सौ. स्मिता धुमाळ, श्री हरिश्चंद्र दळवी, श्री संदीप पाटील, सौ. उज्ज्वला लुकतुके, श्रीमती रतन याडकिकर या कल्याण डोंबिवली महानगर कार्यकारिणीने संमेलनास मोलाचे सहकार्य केले.
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून तब्बल 88 कवींनी या संमेलनात सहभाग नोंदवला. तसेच कोकण, पुणे, सातारा, नाशिक, सोलापूर, नागपूर, बुलढाणा, लातूर, अशा विविध जिल्ह्यातून परिषदेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री बाळासाहेब तोरसकर, श्री नामदेव राठोड, श्री. माणिकराव गोडसे, श्री संदीप तोडकर, प्रा नितीन नाळे, श्री कुलदीप रुघे, सौ गीतांजली वाणी,श्री विठ्ठल घाडी, सौ. जान्हवी कुंभारकर, सौ मनिषा साळवे, श्री भारत घेरे, सौ उषा राऊत, सौ शोभा गायकवाड, श्री सुनील पवार, ,सौ सारिका चव्हाण, श्री उदय क्षीरसागर, श्री मुकुंद देवरे इत्यादी प्रमुख मान्यवर अतिथी उपस्थित होते.
श्री जयंता पाटील, श्री मंगेश म्हात्रे, श्री राजेन्द्र पाटील यांना नवीन पद नियुक्ती देण्यात आली. काही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या सारस्वतांना पुरस्कृत करण्यात आले. शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सर्वांना गौरविण्यात आले. उपस्थितांना नाश्ता, प्रितिभोजन, चहा – पाणी, अशी सोय करण्यात आली होती. अतिशय दिमाखदार, नयनरम्य असा भव्य दिव्य साहित्य सोहळा या संमेलनाच्या निमित्ताने संपन्न झाला. आलेला प्रत्येक व्यक्ती आनंद आणि उत्साहाची भरघोस शिदोरी सोबत घेऊन गेला.
error: Content is protected !!