महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात “गाव तिथं शाखा” हे अभियान राबवण्यात येणार आहे. काही महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा-परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव पातळीवर पक्ष अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येणार असून या अभियानाचा मनसेला नक्कीच फायदा होणार आहे.
या उपक्रमासाठी जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सचिव, तालुका अध्यक्ष, तालुका संपर्क अध्यक्ष व मुंबईतील कोकणातील मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक हे आप-आपल्या गावी जाऊन हे अभियान अधिक सक्षमपणे राबवणार आहे. या अभियानाची सुरवात १५ जानेवारी २०२३ पासून सर्व गाव पातळीवर राबवण्यात येणार आहे अशा सूचना संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांनी दिल्या आहेत.
या संदर्भात आज दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी रायगड येथे तालुका संपर्क अध्यक्ष व जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांची बैठक पार पडली तसेच त्यांना आपल्या आपल्या तालुक्यात जाऊन तालुका निहाय बैठकी लावण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत या उपक्रमामुळे गाव पातळीवर सुद्धा मनसे पक्ष अधिक मजबूत होण्यास मदत मिळणार आहे.