नवी दिल्ली | देशातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल् आहेत. यंदाच्या बजेटमध्ये केंद्राने अंक भेटवस्तू दिल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्रशिक्षण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. श्री अन्न योजना सुरू करण्यात आली असून कृषी क्षेत्रासाठी भांडार क्षमता वाढवणार आहोत. तर इंडियन मिलेट्स इन्स्टिट्यूटची स्थापना केली जाईल.
तसेच कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसंच शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार सुरु करण्यात येणार असून विकास क्लस्टरही योजनाही राबवली जाणार आहे. तसंच शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.हैदराबादमधील श्रीअन्न संशोधन संस्थेला केंद्र सरकारकडून विशेष आर्थिक मदत केली जाणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं.
त्याचप्रमाणे 63 हजार प्राथमिक कृषी क्रेडिट सोसायट्यांचं संगणकीकरण करण्यात आलं आहे. राष्ट्रीय सहकार डेटाबेस तयार करण्यात आहे. आता देशभरात मोठ्या प्रमाणावर विकेंद्रीत स्टोरेज सुविधा निर्माण करण्यात येतील असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आयुष, मत्स्य, पशुपालन, डेअरी, सहकार अशा मंत्रालयांची स्थापना केल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं. मत्स्य विकासासाठी 6 हजार कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे