बँनरवरून वरून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिंदे गटात चांगलेच राजकारण तापले आहे. बॅनरबाजी करत एकमेकांवर अप्रत्यक्षपणे टोलेबाजी करणे सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी कळव्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आली होती. त्या बॅनरवर असे लिहिले होते की, खोका बोका, नगरसेवकांनो स्वत: ला विकू नका, गद्दारी जनता माफ करणार नाही, असे लिहून या बॅनरबाजीतून शिंदे गटावर राष्ट्रवादीने अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
राष्ट्रवादीच्या या टिकेनानतंर लगेचच शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तर देत बॅनर लावण्यात आले होते. या बॅनर मध्ये ‘लबाड ‘बोका’ ढोंग करतोय’ असे लिहिले होते. हे सगळे जागरूक नागरिकांच्या माध्यमातून शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये अप्रत्यक्ष सुरू असलेले बॅनर युद्धामध्ये आज पुन्हा एकदा तिसरा बॅनर समोर आलेला आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि कळवा मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळव्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कोट्यावधी रुपये आणि करोडो रुपयांचा निधी देण्याचे आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. आणि दुसरीकडे कळव्यात या बॅनरबाजीचे युद्ध सुरू आहेत.
अशातच तिसरा बॅनरसुद्धा झळकला आहे. या तिसऱ्या बॅनरमध्ये ‘J A म्हणतच नाही त्याने केला विकास, आम्हीच म्हणतो कळवा होता भकास त्याच्यामुळे झाला विकास. दिघे साहेब सांगून गेले गद्दारांना क्षमा नाही. ठाणे कळवेकर हे कधी विसरणार नाही, असा टोला या बॅनरच्या माध्यमातून लगावण्यात आला आहे; परंतु रात्री लावण्यात आलेले हे बॅनर आता पहाटे पर्यंत उतरवण्यात आले आहेत. अजूनही हे बॅनर कोणी उतरवले हे मात्र स्पष्ट झालेले नाही. बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलेली बोचरी टीका शिंदे गटाला चांगलीच लागली आणि म्हणून हे बॅनर काढले असल्याची चर्चा सध्या कळव्यात रंगली आहे.