आज दिल्लीत महिला कुस्तीपटूंनी आपला हक्क मागितला तर त्यांना अगदी रस्त्यावरून फरफटत नेले जाते, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी केलेले काम सांगण्यासाठी आज टिफिन बैठका घेतल्या जात आहेत. भविष्यात देशाची लोकशाही वाचवायची असेल तर शरद पवारांशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
चिंचोशी (ता. खेड) येथे शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व गावातील नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
पुढे बोलताना खासदार कोल्हे म्हणाले की, ‘शरद पवारसाहेबांनी राज्यात ठिकठिकाणी औद्योगिक वसाहती स्थापन केल्या. साखर कारखाने उभारले. दूध व्यवसायाला चालना दिली. ज्यामुळे राज्याचा विकास होण्यासाठी अधिक चालना मिळाली. याउलट आजच्या काळात लोकांना कृषिमंत्र्यांचेही नाव सांगता येत नाही. ‘जो बोलगा, उनका कान कटेगा’ अशी भयावह परिस्थिती आहे