ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

महाविद्यालयीन विध्यार्थ्यांसाठी आता राष्ट्रवादी मैदानात,’आपले सरकार महाऑनलाईन’ संकेतस्थळ पूर्ववत न केल्यास दिला आंदोलनाचा इशारा

 

 

आपले सरकार महाऑनलाईन सेवेच्या संकेतस्थळाचा वेग मंदावल्याने आरक्षित कोट्यांतून महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच मोठ शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे आपले सरकार महाऑनलाईन संकेतस्थळ तातडीने कार्यान्वित न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवाक्ता ॲड.अमोल मातेले यांनी दिला आहे.

मुंबई सह राज्यभरात आपले सरकार महाऑनलाईन सेवेचा विध्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे. सध्या दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरु आहे.परंतु एकीकडे आपले सरकार गतिमान सरकार म्हणून राज्य सरकार मोठं प्रमाणात जाहीरबाजी करत आहे तर दुसरीकडे याच गतिमान सरकारच्या ‘आपले सरकार महाऑनलाईन सेवेच्या संकेतस्थळाचा वेग मंदावल्याने  आरक्षित कोट्यांतून महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गेल्या आठवड्यापासून संकेतस्थळ मंदावले आहे. तांत्रिक बिघाडाचे कारण सांगितले जात असले, तरी विभागाकडून झालेला गलथानपणाच यास कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी केला आहे. या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहे. संकेतस्थळ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे तसेच नोंदणीची मुदत वाढवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा हि त्यांनी दिला आहे.

error: Content is protected !!