मादळमोही परिसरासह, कोळगाव, तांदळा कडकडीत बंद
अन्न,पाण्याविणा जरांगे पाटलाचा पाचवा दिवस
मादळमोही । प्रतिनिधी;- मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगेसोयरेचा कायदा लागू करावा यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला गेवराई तालुक्यातील मादळमोही कोळगाव तांदळा परिसरात उस्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळतअसून व्यापारी संघाने आपले दुकाने बंद ठेवल्याने बाजारपेठात शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगेसोयरेचा कायदा लागू करावा, यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला गेवराई तालुक्यासह मादळमोही कोळगाव तांदळा येथील सर्व व्यापारी बांधवांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून ग्रामीण भागातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या अमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती अत्यंत खालवलेली आहे. नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला असून सरकारने लवकरात लवकर अधिवेशन बोलवून सगे सोयरे कायद्याचे अंमलबजावणीचा निर्णय घ्यावा नसता महाराष्ट्रात मोठा उद्रेक होईल आणि याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील अशी समाज बांधवांची प्रतिक्रिया येत आहे.
Related posts:
No related posts.