मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने : जामखेड येथे शिवजयंती उत्सव साजरा
जामखेड प्रतिनिधी;-रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील एक महत्त्वाचा गुण म्हणजे धर्मनिरपेक्षता. महाराजांनी हा गुण जनतेपर्यंत पोहचवला आणि अजूनही तो माणसांमध्ये जिवंत आहे. शिवजयंती निमित्त हीच महाराजांना खरी मानवंदना ठरणार आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जामखेड येथील सार्वजनिक शिवजयंती असे मत मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहर भाई काझी यांनी व्यक्त केले.
जामखेड मुस्लिम पंच कमिटी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते.शिवजयंती निमित्त विविध उपक्रम राबविले होते.या मध्ये शरीर सौष्ठ स्पर्धा, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार तसेच सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती ५१,००० हजार रुपये वर्गणी देण्यात आली.जामखेड शहरातील खर्डा चौक, पंचायत समिती समोर जामखेड सेंटर काॅम्प्लेक्स येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करूनअभिवादन करण्यात आले.तसेच सायंकाळी भव्य मिरवणूकीत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.सामाजिक सलोखा जपण्यासाठी एकत्र येण्याचा संदेश यातून दिला.
यावेळी मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहर भाई काझी,हाजी मंजूर सय्यद , मुख्तार सय्यद (टेलर) , इस्माईल सय्यद,आबेद खान साहेब ,शेरखान भाई ,इम्रान कुरेशी ,फरमानभाई शेख,इस्माईल शेख ( टेलर),याकुब तांबोळी ,नय्युम भाई सुभेदार,परवेज खान,आसिफ शेख ,जावीद सय्यद (बारुद),जावीद बागवान,अर्शद शेख,नाजीम काझी,जाहेरभाई मिस्त्री,जाफर सय्यद,हाजी नादीर शेख,सलिम तांबोळी आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.