धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय
एसटी महामंडळाने बीड जिल्ह्यातून संभाजीनगर आणि जालन्याला जाणाऱ्या सर्व बसेस बंद करण्याचा निर्णय
बीड (प्रतिनिधी):-जालन्याच्या अंबड परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. हीच बाब लक्षात घेता, एसटी महामंडळाने बीड जिल्ह्यातून संभाजीनगर आणि जालन्याला जाणाऱ्या सर्व बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या बस बंद करण्यात आल्याचं, बीड एसटी विभाग प्रमुख अजय मोरे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, जालना वगळता जिल्हाभर आणि सर्व जिल्ह्यात जाणाऱ्या बसेस सुरू राहणार, असं देखील मोरे यांनी सांगितलं आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याकडे येणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहेत.