___
. मोठ्या मेहनतीने शेतात पिकवलेल्या टोमॅटोला भाव नसल्याने शेतातील लालचिखल रानाच्या बाहेर काढण्यासाठी शेतक-याला परवडेनासे झाले असून त्यातच महावितरणकडून वीजतोडणी केल्याने मोगलाई आल्याची भावना शेतकरी पांडुरंग वाणी यांनी बोलून दाखवली.
सविस्तर माहीतीसाठी:-
______________________________________
मौजे लिंबागणेश ता.जि.बीड येथील शेतकरी पांडुरंग बाबासाहेब वाणी यांनी 20 गुंठे क्षेत्रात टोमॅटीची लागवड केली, बांबु, तारा बांधणी, मजूर, औषध फवारणी आदि. एकुण दीडलाख रूपये खर्च आला अपेक्षित उत्पन्न 4 लाख रूपये होते परंतु भरपूर पिक आल्यानंतर अचानक भाव पडल्याने बाजारात नेऊन विक्रीस न परवडल्याने शेतातच टोमॅटोचा लाख चिखल पाहण्याची वेळ आली असून वावराबाहेर काढणीसाठी अतिरिक्त खर्च परवडेनासा झाला आहे.
महावितरणची मोगलाई वसुली आणि ई-पीक पाहणीचा फार्स:-,डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
_________________________________________€
आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांची 6 दिवसापासून विजतोडणी केल्यामुळे पिकाचे नुकसान झालेले आहे, प्रत्येकी 5000 रू कोटोशन प्रमाणे विज जोडणी न करण्याचा महावितरणचे अभियंता यांच्या मोगलाई आदेशाने जास्तच अडचणीत आला आहे. त्याचबरोबर ई-पीक पाहणी केवळ फोटोसेशन पुरतीच मर्यादित असून शेतक-यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्यापेक्षा रसत्यालगत शेतात फोटो काढून हाॅटेल मध्ये बसुन अहवाल लिहला जात असल्याची बहुतांश शेतक-यांची तक्रार आहे.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.8180927572