सोमवारपासून वेळेच्या बंधना अधीन राहून हिंगोली जिल्ह्याची बाजारपेठ सुरु.
🔸अशोक काळकुटे | संपादक
▪️परमेश्वर सावंत | हिंगोली.
राज्यात तसेच हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण हिंगोली जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी हद्दीतील सर्व प्रकारच्या हालचालीस (व्यक्ती/वाहन) व सर्व आस्थापना, दुकाने, इत्यादी करिता दि. 29 मार्च, 2021 रोजी सकाळी 7.00 ते दि. 4 एप्रिल, 2021 रोजी रात्री 12.00 या कालावधीत 07 दिवस संचारबंदी लागू केली होती या संचारबंदी आदेशाचे जिल्ह्यात काटेकोरपने पालन करण्यात आले.
आज दि 4 एप्रिल रोजी जिल्हाधिकरी हिंगोली यांनी पारित केलेल्या आदेशानुसार विविध आस्थापने दुकाने उघडण्यास वेळेचे बंधन घालून परवानगी देण्यात आलेली आहे.
प्रत्येक आठवड्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी ७ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात खडक संचारबंदी लावण्यात आली असून संचारबंदी कार कालावधीमध्ये औषधी दुकाने रुग्णालय अत्यावश्यक सेवा तसेच परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल याशिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने बाजारामध्ये गल्लीमध्ये गावांमध्ये तसेच घराबाहेर फिरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
४ एप्रिल रोजी निर्गमित करण्यात येत असलेल्या आदेशाची अंमलबजावणी प्रशासनाने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी हिंगोली यांनी आदेशात दिल्या आहेत.