मंंडणगड – कुंबळे गावचे प्रथम नागरिक ,सरपंच म्हणून आपण नक्कीच उत्तम सरपंच म्हणून आदर्श जनतेसमोर ठेवला आहे,
कोकण संपादक / भरत सरपरे
किशोर दळवी / सरपंच कुंबळे
आज आपला मराठा समाज हा नक्कीच खूप मोठा आहे, व वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहे,
त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्षात प्रत्येक जण काम करीत आहे,
इतर समाजाचे आपण उदाहरण घेतले तर ती लोक समाजाच्या व्यासपीठावर एकत्रित येतात तसेच वेगवेगळ्या पक्षात असूनही एकमेकांवर टीका करीत नाही,
वास्तविक सरपंच किशोर दळवी ह्यांनी कुंबळे गावचा विकासच नुसता केला नाही तर सदर गावाला एक दर्जा मिळवून दिला,
परंतु होते कसे कधी कधी दुसऱ्या समाजातील व्यक्ती आपल्याच समाजाच्या व्यक्तीतचा फायदा घेऊन आपल्याच समाजातील व्यक्तीला हीन समजतो व कमी लेखतो
काल कुंबळे येथील भाषणात एक अधिकारी म्हणाले की मी 32 वर्ष नोकरी केली ,त्यातील 25 वर्ष मंडणगड तालुक्यातच केली,
मग संशोधनाचा भाग असा उरतो की त्यामुळे मंडणगड चा विकास झाला की अजून काही?
व मंडणगड मधेच का 25 वर्ष नोकरी केली,
मंडणगड तालुक्याचे व विशेष मराठा समाजाचे दुर्दैव आहे की सगळे मराठा समाजातील समाज, राजकीय नेते , हे कधीच एक होत नसून , प्रत्येक वेळी प्रत्येक बाहेरून आलेला अधिकारी एखाद्या मराठा नेत्याला धरून मंडणगड वर राज्य करतो
किशोरजी आपण मराठा समाज मंडणगड चे अध्यक्ष आहात , आपणच सर्व राजकीय पुढार्यांना एकत्रित व्यासपीठावर आणून त्यांच्यावर टीका टिपणी न होता त्याना मोठं केलं पाहिजे ही विनंती