ब्रेकिंग न्युज
लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळे

 ऊंच नीच काही नेणो भगवंत, तिश्ठे भाव भक्ती देखोनिया|  – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

 

 

युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या फेसबूक वॉलवरून   

 

असे ठाम पणे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील वारकरी परंपरा ही भेदाभेद न मानणारी क्रांतिकारी चळवळ आहे. कुणीही जन्माने, वर्णाने, लिंगाने उच्च किंवा कनिष्ठ असत नाही. सर्वजण ही त्या परमात्म्याची उत्पत्ती आहे. त्यामुळे सर्वांचाच अधिकार समान आहे अशी शिकवण वारकरी सांप्रदायाने महाराष्ट्रात रुजवली.

 

त्याच परंपरांना राज्यकर्ते म्हणून शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी आपल्या राज्य व्यवस्थेत समाविष्ट केले होते. शिवाजी महाराज जेंव्हा अठरा पगड जाती बारा बलुतेदार सोबत घ्यायचे आणि शाहू महाराजांनी बहुजन समाजाला एका छताखाली आणले त्यामागे सुद्धा तुकोबांचे हे चिंतन असेल का? म्हणजे जात पात न बघता योग्यता बघून महाराज आपल्या मावळ्यांना सोबत घ्यायचे. तर ज्या लोकांना शेकडो वर्षे व्यावस्थेपासून दूर ठेवले गेले अश्यांना आरक्षण लागू करून शाहू महाराजांनी मुख्य प्रवाहात सामील करून घेतले.

 

तुम्हाला वेदाध्ययन करण्याचा अधिकार नाही असे म्हणणाऱ्यांना ठणकावत तुकाराम महाराजांनी ‘वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा इतरांनी( त्यांना उद्देशून)वहावा भार माथा’असे म्हटले. आणि सर्वसामान्य लोकांसाठी वेद खुला केला. त्याच पद्धतीने वैदिक स्कूल ची स्थापना करून शाहू महाराजांनी सर्व समाजासाठी वेद अध्ययन खुले केले. ही तुलना किती बरोबर किती चूक हे बघण्यापेक्षा माझी ती श्रद्धा आहे.

 

माझ्या आजीमांनी, म्हणजे स्व. श्रीमंत राणीसाहेब मंगलाराजे भोसले, नागपूर सीनिअर यांनी लहानपणी विठ्ठलाची भक्ती किती साधेपणाने करता येते याचे संस्कार माझ्यावर बिंबवले होते. पंढरपूर, देहू, आळंदी, आषाढी वारी हे सर्व काही ऐकायला मिळायच. विठुरायाची भोळी भाबडी भक्ती करायला माझ्या आजीमांनी शिकवलं.

 

मी आज जीवनात पहिल्यांदा आषाढी वारी मध्ये सहभागी झाले. महाराष्ट्राची वारी ही उज्ज्वल परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. त्या परंपरे मध्ये सहभागी होण्याची जन्मो जन्मीची इच्छा पूर्ण झाली. छत्रपती संभाजीराजेंच्या हस्ते तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान झाले. त्यांच्या समवेत मी आणि आमचे चिरंजीव शहाजीराजे उपस्थित होतो, ही आमच्यासाठी सुद्धा पर्वणी होती. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेंव्हा या विठ्ठले कृपा केली. ही भावना आज मनात ओतप्रोत भरलेली आहे.

 

वारकरी संप्रदायाने, सर्वच वारकऱ्यांनी आम्हा छत्रपती घराण्यावर जे प्रेम दाखवले त्याला शब्दात व्यक्त करू शकत नाही. हे प्रेमसुख जगात इतरत्र कुठेही अनुभवायला भेटणार नाही. पंढरीनाथ पांडुरंगाने आमच्यावर अशीच कृपा राहू द्यावी ही प्रार्थना.

error: Content is protected !!