सांगली | सतत वादग्रस्त वक्तव्य करत नेहमीच चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यात कोरोना म्हणजे थोतांड आहे, मंदिराचे कुलूप तोडा आणि वारकऱ्यांनी रस्त्यावर उतरा असे वादग्रस्त आणि चितावणीखोर विधान त्यांनी केले होते.
आता या विधानावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी संभाजी भिडे गुरुजी यांना महाराष्ट्रातून तडीपार करावे, अशी मागणी केली. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून संभाजी भिडे समाजव्यवस्था बिघडेल अशी वक्तव्य करत आहेत.
आता त्या पाठोपाठ संभाजी भिडे म्हणतात कोरोना म्हणजे थोतांड आहे, मंदिराचे कुलूप तोडा आणि वारकऱ्यांनी रस्त्यावर उतरा. असे चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना महाराष्ट्रातून तडीपार करावे, असे खरात म्हणाले. संभाजी भिडे यांना तडीपार करण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे सचिन खरात यांनी केली आहे.