सांगली येथे कृष्णा नदीचा पूर ओसरून पाणी पातळी ४० फुट इतकी सुरक्षित झाली आहे . ती आणखी कमी होत आहे. सध्या कोयना धरणात पाणी साठा ९० टीएमसी असून (८७%) धरणातून ३०००० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
पुढील आठवड्यात मोठ्या पावसाचा अंदाज असून धरणातून पाणी विसर्ग थोडासा वाढवून पाणी साठा कमी केल्यास मोठ्या पावसाच्या कालावधीत विसर्ग नियंत्रित ठेवतां येईल . त्यामुळे कोयना धरणातून सद्याचा ३०००० विसर्ग थोडासा वाढवून ५०००० क्यूसेक्स करण्याचे नियोजन आहे असे सुद्धा त्यांनी सांगितले
तसेच सांगली येथे कृष्णाची पातळी काही प्रमाणात वाढेल परंतु घाबरणयाचे कारण नाही,मोठा पाऊस जर आला तर तो धरणांतच अडवण आवश्यक आहे.नागरीकानी काळजी करू नये