सांगली | राज्यात मागच्या महिन्यात मुसळधार पाऊस आणि पुराने कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्राचे मोठ्या प्रमाणात पुराच्या पाण्याने नुकसान झाले होते. त्याच नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सांगलीत दाखल झाले होते. त्यांनी आज सांगलीतील भिलवडीला भेट दिली. दरम्यान, या संकटातून मार्ग काढणारचं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्री बोलत असताना, खाली एका नागरिकाने चांगलाच गोंधळ घातला. तो मुख्यमंत्र्याना मदतीची मागणी करत होता. साहेब मदत करा, चार वर्ष झाले पायात चप्पल घातली नाही, असं तो बोलत होता. यामुळे मुख्यमंत्री बोलतांना अचानक झालेल्या गोंधळुले एकच खळबळ उडाली होती.
तो नागरिक मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यासाठी आला होता. यावेळी पोलिसांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. ‘मुख्यमंत्री साहेब मी चार वर्ष अनवाणी फिरतोय, मला भेटू द्या, मुंबईत आल्यावर मला पोलीस अटक करतात’, असे म्हणत तो नागरिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करत होता.