सोलापूर संपादक -महेश पवार
प्रतिनिधी- संतोष विभूते
सोलापूर रेल्वे मार्ग धक्क्यातून जिल्ह्यामधले अन्नधान्य तसेच सिमेंट सह अन्य मालाची वाहतूक करण्यात येते मात्र मेहबूब सुभानी दर्गा ते रेल्वे मालधक्का पर्यंतचा रस्ता खराब होऊन ही वाट अत्यंत बिकट बनले आहे यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत.दरम्यान अडथळे दूर करून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी आर पी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विराज रविकांत पाटील यांनी खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्याकडे केली आहे.गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची अवस्था अत्यंत भयानक झाली आहे अक्षरशा गुडघ्यावर खड्डयांमधून हजारो गाड्या ये-जा करत असतात. आजपर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत त्याचबरोबर गाड्यांचे मोठे नुकसान होत असून कोणीही आजपर्यंत या रस्त्याकडे लक्ष दिले नाही. सर्व नेतेमंडळी ची कायमच या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे हा रस्ता दुरुस्त करून वाहतुकीतला अडथळा दूर करण्याची मागणी विराज पाटील यांनी केली आहे यावेळी आर पी ग्रुपचे सल्लागार राजू हौशेट्टी मयुर घुगे रवी बिराजदार आकाश मकाई नीलेश धुमाळ आकाश बेलयाळ अनिल माने यांच्यासह आर पी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते .