ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

वैभव नाईक एक व्यक्ती म्हणून नाही तर सामान्य शिवसैनिक म्हणून राणेंना आव्हान देतोय

कणकवली : भाजपचे आमदार आमदार निलेश राणे यांचा कणकवलीत पराभव करून शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ, अशी गर्जना शिवसेना पक्षाचे कणकवली मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या दिवसात शिवसेना- राणे यांच्यात वाद आणखी पेटण्याची चिन्ह दिसून येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदावर भाजपाचा दणदणीत विजय झाल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर सडकून टीका करता वैभव नाईक यांना आव्हान दिले होते.राणेंना धक्का देणा-याला दहा जन्म घ्यावे लागतील अशी टीका नितेश राणे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला वैभव नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

वैभव नाईक हे आमच्याशी आयुष्यात कधीच स्पर्धा करू शकत नाहीत. सिंधुदुर्गात राणेंना आव्हान देणारा किंवा धक्का देणा-याला दहा जन्म घ्यावे लागतील असे आव्हान नितेश राणे यांनी शिवसेनेला दिले होते. आमदार निलेश राणे यांनी दिलेले आव्हान स्वीकारून नाईक म्हणाले की, त्यांचे आव्हान आम्ही शिवसैनिक स्वीकारून नितेश राणेंचा कणकवलीत पराभव करुन शिवसेना काय आहे, हे दाखवून देऊ, असा निर्धार आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

नितेश राणेंचा कणकवलीत पराभव करुन शिवसेना काय आहे, हे दाखवून देऊ. नारायण राणेंचे आव्हान आम्ही कधीच संपवले. वैभव नाईक एक व्यक्ती म्हणून नाही तर सामान्य शिवसैनिक म्हणून राणेंना आव्हान देऊन २०१४ च्या निवडणुकीत राणेंसारख्या माजी मुख्यमंत्र्याचा पराभव केला तर गेल्या निवडणूकीत माझ्या मुळेच नारायण राणेंनी पळ काढला, अशी जोरदार टीका वैभव नाईक यांनी राणेंवर केली.

error: Content is protected !!