ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

काँग्रेसने निर्णय घेतला नाही म्हणून वडिलांनी आत्महत्या केली; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी काँग्रेसवर आरोप लागवल्यानंतर आता अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप लगावला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वप्रथम काँग्रेसची सत्ता असताना दिवंगत माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी मांडला. मंत्रालयावर १९८२ साली मोर्चा काढला होता.

मात्र, त्यानंतर कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली. अण्णासाहेब पाटलांनी म्हणजेच माझ्या वडिलांनी काँग्रेसने कोणताही निर्णय घेतला नाही म्हणून आत्महत्या केली, असा गंभीर आरोप कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केला आहे. ते बीड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. आता त्यांच्या या आरोपामुळे राज्यतील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.

माझे वडील काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार होते. त्यांनी आर्थिक निकषावर मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर काहीच निर्णय घेतला गेला नाही. मराठा आरक्षणासाठी १९८२ साली काँग्रेसने कोणतीच समिती स्थापन केली नाही आणि म्हणून वडिलांनी आत्महत्या केली, असा गंभीर आरोपही नरेंद्र पाटील यांनी केला.

error: Content is protected !!