वक्रतुड साहित्य कला संस्कृती मंच ठाणे ,प्रमुख जगन्नाथ खराटे, ह्यांच्या घरगुती इकोफ्रेंडली गणेशाचे घरच्या घरी विसर्जन,,
कोकण संपादक / भरत सरपरे
कल्याण प्रतिनिधी / राकेश पिंपळकर
कल्याण (ठाणे):”वक्रतुंड साहित्य कला संस्कृती मंच ठाणे प्रमुख,
जगन्नाथ खराटे ह्यांच्या घरगुती इकोफ्रेंडली गणेशाचे घरच्या घरी विसर्जन करण्यात आले. गेल्या २४वर्षापासुन अगदी अखंडपने गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहेत. त्यांच्या राहत्या घरी, ह्या वर्षीही पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी अगदी शाळुच्या मातीची बालगणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती,तसेच गेल्या पांच वर्षांपासून, अगदी साध्या सोप्या पद्धतीने प्रदुषणरहीत आरास करुन गौरी विसर्जनाच्य दिवसी, श्रीगणेश विसर्जन हे घरासमोरील आवारात करण्यात येत असते. तसेच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून,खराटे परिवारांतर्फे,अगदी सेवाभावनेतुन, अनाथाश्रमातील मुलांना भोजन वाटप केले जाते, तसेच विद्यार्थ्यांना, शालेय साहित्य देवुन ,ते सामाजिक सेवेचा आदर्श समाजापुढे ठेवून सामाजिक कर्तव्याची जाणीव तेवत ठेवत आहे. तसेच “व्रक्रतुंड साहित्य कला संस्कृती मंच, ठाणे” माध्यमातून” गणेश, सजावट ऊपक्रम, आणि गणेश प्रश्नमंजुषा उपक्रम राबविले जातात. ह्या उपक्रमांत सहभागी सर्वच मान्यवरांना “आॉनलाईन ,समाजसेवी सन्मानपत्र” देऊन गौरविण्यात आले आहे.. एकुणच सामाजिक जाणीवेतुन हे समाजसेवी कार्य प्रत्येकाने करायला पाहिजे असे त्यांचे मत आहे.