जालना तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची तात्काळ पाहणी करून मदत द्या व ओला दुष्काळ जाहीर करा.
जालना प्रतिनिधी :- जालना तहसीलदार साहेब आपणास विनंती करण्यात येते की जालना तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयबीन, कापुस, तुर, मुग, उडिद, भुईमूग, ऊस व फळबाग तसेच द्राक्ष या पिकांचे पूर्ण नुकसान झाले आहे. तरी आता राज्य सरकारने महाराष्ट्रतील शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच जालना तालुक्यातील पंचनामे न करता शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रु. नुकसान भरपाई म्हणून मदत जाहीर करावी नसला शेतकन्यांन सह रस्त्यावरती उतरुण तीव्र आंदोलन करण्यात येईल ही आपणास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना तालुक्याच्या वतीने हात जोडुन विनंती. यावेळी उपस्थित कृष्णा खलसे तालुकाध्यक्ष जालना, ॲड हरीदास लांडे जिल्हाध्यक्ष विधीकक्ष जालना, श्रीकांत राठोड तालुका उपाध्यक्ष, राजेश राठोड, नामदेव पवार, वामन चौधरी आदी उपस्थित होते.
Related posts:
No related posts.