रोहा तालुक्यातील नेहमी चर्चेत असणाऱ्या धाटाव गावात दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा ‘गरबो रमतो जाय’; गरबा, दांडियांच्या कार्यक्रमांची जय्यत तयारी…
कोकण संपादक / भरत सरपरे
रोहा प्रतिनिधी / रुपेश रटाटे
मनाला सुखावणाऱ्या गीत, वाद्यांचा ताल अन् तालावरचे शिस्तबद्ध पदलालित्य यांचा सुंदर सोहळा म्हणजे गरबा. दोन वर्षांपासून कोरोनाच्या बंधनात अडकलेली पावले यंदा प्रदीर्घ काळानंतर उत्साहाच्या लाटांवर थिरकरणार आहेत. रोहा शहरातील नामवंत म्हणजे धाटाव या परिसरात गरबा व दांडियांच्या खेळाची जय्यत तयारी करण्यात आली आहे .व त्यामुळे यंदा ‘गरबो रमतो जाय’चा आवाज घुमणार आहे.
गेल्या दोन वर्षांत अनेक मंडळांनी साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा केला. निर्बंध असल्याने मनातल्या उत्साहांना बांध घातला गेला. यंदा बांध फुटणार आहे. गरबा व दांडिया खेळाची रंगीत तालीम गेले आठवडाभर सुरू झाली आहे. ग्रामस्थांच्या प्रयत्नातून मोठ्या सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण गाव यंदा या नृत्यात रंगणार आहे.