सोलापूर संपादक – महेश पवार
प्रतिनिधी अफजल शेख
लोकसहभागातून मंद्रूप येथे वनराई बंधारे मा.जिल्हा कृषी अधिकारी श्री.बाळासाहेब शिंदे साहेब ,तसेच मा.उपविभागीय कृषी अधिकारी श्री.कवडे साहेब , मा.तालुका कृषी अधिकारी श्री.आर.एस. माळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारे करण्यात आले ..
सन 2022-23 या वर्षात पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात झाले आहे त्यामुळे सद्यस्थितीत ओढे-नाले यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे सध्या पावसाळा संपत आल्याने ओढे -नाले यामधील वाहून जाणारे पाणी अडवून पिकांना संरक्षित सिंचन देणे जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी वनराई बंधारे लोकसहभागातून घेण्यात आला जून ते सप्टेंबर पावसाळी हंगाम संपल्यानंतर बऱ्याच कालावधीपर्यंत नाले व ओढ्यामधून पाण्याचा प्रवाह चालू असतो हा पाण्याचा प्रवाह पारंपरिक पद्धतीने अडवून पाण्याचा साठा करून बिगर पावसाळी हंगामातील पाण्याची गरज काही अंशी भागविण्यासाठी उपलब्ध साधनांचा सिमेंट रिकामे पोते वापर करून बंधारा बांधण्यात आला या वनराई बंधाऱ्याद्वारे सरासरी दोन हेक्टर क्षेत्रास संरक्षित सिंचन उपलब्ध होईल काही ठिकाणी जास्तीचा पाणीसाठा उपलब्ध होऊन सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.
रमेश फरताडे ,कृषि सहाय्यक, मंद्रूप
उपस्थित शेतकरी काशिनाथ जेऊरकर , कृषी मित्र पत्रकार गजानन काळे,युवराज साठे ,पत्रकार-बबलू शेख, केदार जोडमोटे श्री.शिवानंद आडोळे,महादेव कांबळे, विठ्ठल डोमनाळे,विजय हजारे ,मल्लू अडोळे