ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

सावरकरांची माफी मागा, मगच महाराष्ट्रात पाय ठेवा!* • भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा राहुल गांधींना इशारा

 

 

महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माफी मागावी. नंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

नागपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान चौकातील पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर माध्यमाशी बोलताना श्री. बावनकुळे म्हणाले,”राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पाच वेळ अपमान केला. आताही त्यांची आडमुठी भूमिका कायम आहे ; त्यांनी माफी मागितलेली नाही. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची वारंवार अवहेलना केली. त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. जाणीवपूर्वक नाव घेऊन अपमान करीत राहिले. त्यांनी सावरकरांविषयी बोलू नये. त्यांची उंची नाही, पात्रताही नाही. त्यांना याबाबत समजावून सांगितले. मात्र त्यांच्यात कोणताही फरक पडला नाही. उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सर्व वक्तव्याची माफी राहूल गांधी यांनी मागावी.

श्री बावनकुळे म्हणाले, ‘भारतात राहणारा प्रत्येक नागरिक, मग तो कोणत्याही धर्माचा अथवा समाजाचा असो तो भारतीय आहे. भारत हाच हिंदुस्तान असल्याने त्यांचे विचार हिंदुत्ववादी आहेत. हिदुस्तान हाच भारत आहे’.

error: Content is protected !!