ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

राखी सावंतने राहुल गांधींना दिला लोकसभा निवडणूक जिंकण्याचा मंत्र

 

अभिनेत्री राखी सावंत नेहमीच तिच्या विचित्र वागण्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. राखी सावंतने दोन दिवसापूर्वी युजर्सला महागाईच्या काळात टोमॅटो पिकवण्यासाठी जुगाड सांगितला होता. अशातच आता राखी सावंतने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना फुकटचा सल्ला दिला आहे. तिचा हा सल्ला ऐकून काँग्रेसचे कार्यकर्ते सैरभैर झाल्याचं दिसून येतं आहे.

 

राखीला पत्रकारांनी घेरलं. त्यावेळीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल असल्याचं दिसतंय. राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होऊ शकतात का?, असा सवाल पापाराझींनी केला. यावर राखी म्हणाली की हो नक्कीच, मला वाटतं की जर राहुल गांधी बिग बॉसमध्ये आले तर ते नक्कीच देशाचे पंतप्रधान होतील, असं राखी म्हणते. राखीच्या उत्तरामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या.

 

राहुल गांधी यांनी बिग बॉसमध्ये का यावं? असा प्रश्न राखीला विचारला गेला. त्यावर राखीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. जो कोणी बिग बॉसमध्ये येतो, त्याचा आयुष्य बनतं, राहुल गांधींचंही आयुष्य बनेल. राहुल गांधींना बिग बॉसमध्ये कास्ट केलं पाहिजे, कारण त्यांनी बिग बॉसमध्ये प्रवेश केला तर ते पुढची निवडणूक जिंकतील, असा विश्वास देखील राखीने व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!