ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

मनसे आंदोलनामुळे वाहतूक कोंडी; प्रवाशांना सहन करावा लागतोय मनस्ताप

 

मुंबई गोवा महामार्गावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नहरतीया जनता पक्षाला लक्ष केलं आहे. रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतलीये. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेने जागर पदयात्रा काढली आहे. मात्र या पदयात्रेमुळे सामान्य नागरिकांना मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती समोर आलीये.

मनसेच्या जागर यात्रेचा फटका मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणा-या वाहन धारकांना बसतोय. सकाळपासून मनसेचं आंदोलन मुंबई गोवा महामार्गावर सुरू आहे. त्यामुळे या महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मोठा अडथळा सहन करावा लागत आहे. त्यामुळे गाड्यांच्या रंगाच्या रांगा लागल्या आहेत

या वाहतूक कोंडीचा मनस्ताप वाहनधारकांना सहन करावा लागतोय. जागर यात्रेमुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालीये. मुंबई-गोवा महामार्गावरुन अनेक चाकरमानी सकाळच्यावेळी प्रवास करत असतात. सकाळी ७ वाजल्यापासूनच या यात्रेला सुरूवात झाल्याने कामावर जाण्यासाठी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलाय.

 

error: Content is protected !!