मुंबई गोवा महामार्गावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नहरतीया जनता पक्षाला लक्ष केलं आहे. रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतलीये. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेने जागर पदयात्रा काढली आहे. मात्र या पदयात्रेमुळे सामान्य नागरिकांना मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती समोर आलीये.
मनसेच्या जागर यात्रेचा फटका मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणा-या वाहन धारकांना बसतोय. सकाळपासून मनसेचं आंदोलन मुंबई गोवा महामार्गावर सुरू आहे. त्यामुळे या महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मोठा अडथळा सहन करावा लागत आहे. त्यामुळे गाड्यांच्या रंगाच्या रांगा लागल्या आहेत
या वाहतूक कोंडीचा मनस्ताप वाहनधारकांना सहन करावा लागतोय. जागर यात्रेमुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालीये. मुंबई-गोवा महामार्गावरुन अनेक चाकरमानी सकाळच्यावेळी प्रवास करत असतात. सकाळी ७ वाजल्यापासूनच या यात्रेला सुरूवात झाल्याने कामावर जाण्यासाठी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलाय.