ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !

राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाचेच असल्याची केंद्रीय निवडणूक आयोगाने केली मोठी घोषणा

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाचेच असल्याची केंद्रीय निवडणूक आयोगाने केली मोठी घोषणा

मुंबई (प्रतिनिधी):-शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येही २ जुलै २०२३ ला उभी फुट पडली होती. अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने पक्षात दोन गट पडले. ज्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटाकडून पक्षावर दावा करण्यात आला. याचबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु होती. ज्याचा निकाल आज लागला आहे. ज्यात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिला आहे.

”या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार”
निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर केल्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ”निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय. देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली गेलेली सकृतदर्शनी दिसत आहे.”

जयंत पाटील म्हणाले, ”या निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे.”

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने अजित पवार गटाकडून जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

error: Content is protected !!