ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

तयारीला लागा! राज्यात 100 टक्के पोलिस भरती होणार, सरकारचा मोठा निर्णय

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

तयारीला लागा! राज्यात 100 टक्के पोलिस भरती होणार, सरकारचा मोठा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) :- पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी गूड न्यूज आहे. राज्यात आता 100 टक्के पोलिस भरती होणार आहे. 100 टक्के पोलीस भरती करण्यास वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. यामुळे पोलिस भरतीचा माग्र मोकळा झाला आहे. राज्यात तब्बल 17471 पोलिसांची भरती होणार आहे.

राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करता येते. पण पोलीस खात्यात 100 टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे. पोलीस शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी एकूण 17471 पदांची भरती केली जाणार आहे.

पोलिसांच्या कंत्राटी भरतीवरुन झाला होता वाद
सरकारी नोकरीत कंत्राटी भरतीवरून वाद सुरू असतानाच शिंदे फडणविस सरकारने काही महिन्यांपूर्वी पोलिसांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला होता. सन 2023 मध्ये नवरात्रौत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मुबई पोलिसांच्या मदतीसाठी कंत्राटी पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मुंबईत 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार होती. राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांमधून कंत्राटी भरती करण्याचा गृहखात्याचा प्लान होता. या जवानांना पोलिसांसारखे प्रशिक्षण देऊ कंत्राटी पद्धतीनं 11 महिन्यांसाठी भरती केली जाणार होती. या कंत्राटी पोलिसांच्या तीन महिन्यांच्या पगारासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची टंचाई असल्यानं नवीन भरती होईपर्यंत गृह खात्यानं हा निर्णय घेतल्याचं सरकारनं स्पष्ट केले होतो. मात्र, या निर्णयावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईसारख्या संवेदनशील शहराची सुरक्षा कंत्राटी पोलिसांवर सोपवणं किती योग्य आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. कंत्राटी भरतीविरोधात संभाजी ब्रिगेडनं मंत्रालयात आंदोलन केल होतो. जोरदार विरोध झाल्यामुळे सरकारने पोलिसांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय मागे घेतला होता.

पोलीस भरतीमध्ये एमबीए, इंजिनिअर्स तरुणांचे अर्ज
2018 च्या पोलीस भरतीत मोठ्याा संख्येने उच्च शिक्षित उमेदवारांनी अर्ज भरले होतो. यात अगदी इंजिनिअर्स,एमबीए,एमए,एमएससी,एमकाॅम अशी उच्च पदवी घेतलेल्यांची संख्या अधिक होती. 1449 पेलिस कॉन्स्टेबल पदासाठी मुंबई पोलिसांची भरती पार पडली. ज्यासाठी तब्बल 109 एमबीए धारकांनी अर्ज केला तर, 1 हजार 978 एमए, 543 एमकॉम, 423 इंजिनिअर्स, 63 एमएसडब्ल्यू, 30 एमसीए अशा पोस्ट ग्रॅज्यूएट्ससहीत हजारो पदवीधारकांनी अर्ज केले होतो. यामधुन 446 पदवीधारक, 27 उच्च पदवीधारक आणि 986 एचएससी धारकांची निवड झाली होती.

error: Content is protected !!