आंबेडकरी चळवळ तळागाळात पोहचविण्याचे काम युवकांनी करावे : पप्पू कागदे
बीड / प्रतिनिधी;-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी शिका,संघटित व्हा संघर्ष करा हा मूलमंत्र देऊन या देशातील तमाम उपेक्षित समूहातील समाज बांधवांना आपल्या हक्क व अधिकारासाठी आवाज उठविण्याची व लढा उभारण्याची ताकद निर्माण करून देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी युवकांनी संघटीत होऊन आंबेडकरी विचारधारा तळागाळात पोहोचविण्याचे काम करावे. असे प्रतिपादन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइं बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 133 व्या जयंतीनिमित्त देवी बाभूळगाव, खंडाळा,पोखरी, खंडोबाची वाडी, आहेर चिंचोली, बेलखंडी पाटोदा या गावी केले. पुढे बोलताना पप्पू कागदे म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून आगामी काळात आंबेडकरांना अपेक्षित असलेली समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन व्यसनाधीन होत असलेल्या तरुण पिढीला व्यसनातून मुक्त करण्यासाठी गावागावात व्यसनमुक्ती अभियान राबवून व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून करावे असे मत पप्पू कागदे यांनी व्यक्त केले. यावेळी राजू जोगदंड, किसन तांगडे,महादेव उजगरे, बापू पवार, सुभाष तांगडे, राजेंद्र शेळके, प्रकाश शेळके, दीपक जावळे, सुशील जावळे,धम्मपाल जावळे, चंद्रकांत जोगदंड, विकास रकटे, एकनाथ ईनकर, महादेव ईनकर, नामदेव वाघमारे, चिमाजी वाघमारे, देवा वाघमारे, बारीकराव वाघमारे, सिद्धार्थ वाघमारे आदी उपस्थित होते.
Related posts:
No related posts.