कुस्त्यांची परंपरा लोप पावत चालली आहे – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
नवगण राजुरी दि.29(प्रतिनिधी)ः- मैदानी आणि मर्दानी खेळ डोळ्याचे पारणे फेडणारे असून अनेक गावच्या कुस्त्यांची परंपरा लोप पावत चालली आहे असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
नवगण राजुरी येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी सय्यद जानपीर उर्स निमित्त शनिवार दि.27 रोजी संदल आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली व दि.28 रोजी ताजी यात्रा आणि सोमवार दि.29 रोजी जंगी कुस्त्यांचे सामने संपन्न झाले. यावेळी जिल्ह्यातील कुस्तीगिर मल्लांनी हजेरी लावून लहान मोठ्या कुस्त्यांचे सामने झाले. कुस्ती विजेत्या मल्लांना बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी रविंद्र क्षीरसागर, अरूण डाके, सुधाकर मिसाळ, हेमंत क्षीरसागर, बाळू आवारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासूनची नवगण राजुरीच्या कुस्त्यांची परंपरा आहे. नानांच्या काळात नवगण राजुरीत जिल्ह्यात नंबर 1 कुस्त्या असायच्या. कुस्त्यांचा फड रंगत आणि खरी कुस्ती काय होती हे आम्ही बालपणी पहायचो. पुर्वीपासून काळ्या मातीचा फड जागवला आहे. ही परंपरा भविष्यात कायम रहावी. या कुस्त्यांच्या हंगामाला पुर्वी राज्यातून पैलवान यायचे आणि या स्पर्धा पहायला परिसरातून लोक येत होते. अनेक गावात कुस्त्यांची परंपरा होती, सध्या काही गावात ही परंपरा बंद होऊ लागली आहे असे त्यांनी सांगितले.
या कुस्त्याचा फड जिल्ह्यातील नामांकित पैलवानांनी हजेरी लावून गाजवला.
नवगण राजुरी येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी सय्यद जानपीर उर्स निमित्त शनिवार दि.27 रोजी संदल आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली व दि.28 रोजी ताजी यात्रा आणि सोमवार दि.29 रोजी जंगी कुस्त्यांचे सामने संपन्न झाले. यावेळी जिल्ह्यातील कुस्तीगिर मल्लांनी हजेरी लावून लहान मोठ्या कुस्त्यांचे सामने झाले. कुस्ती विजेत्या मल्लांना बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी रविंद्र क्षीरसागर, अरूण डाके, सुधाकर मिसाळ, हेमंत क्षीरसागर, बाळू आवारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासूनची नवगण राजुरीच्या कुस्त्यांची परंपरा आहे. नानांच्या काळात नवगण राजुरीत जिल्ह्यात नंबर 1 कुस्त्या असायच्या. कुस्त्यांचा फड रंगत आणि खरी कुस्ती काय होती हे आम्ही बालपणी पहायचो. पुर्वीपासून काळ्या मातीचा फड जागवला आहे. ही परंपरा भविष्यात कायम रहावी. या कुस्त्यांच्या हंगामाला पुर्वी राज्यातून पैलवान यायचे आणि या स्पर्धा पहायला परिसरातून लोक येत होते. अनेक गावात कुस्त्यांची परंपरा होती, सध्या काही गावात ही परंपरा बंद होऊ लागली आहे असे त्यांनी सांगितले.
या कुस्त्याचा फड जिल्ह्यातील नामांकित पैलवानांनी हजेरी लावून गाजवला.
Related posts:
No related posts.