पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यात या प्रकरणी भारतीय जनता पक्षाने बदनामी केल्याचा आरोप बंजारा समाजाने लगावला आहे. ही तक्रार बंजारा समितीचे युवा जिल्ह्याध्यक्ष श्याम राठोड यांनी केली असल्याचे वृत्त समोर येत आहे.
विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांसह बड्या नेत्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप आमदार अतुल भातखळकर, भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार अशिष शेलार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रसाद लाड यांची नाव घेण्यात आली आहेत.
या प्रकरणात पूजा चव्हाण हिची बदनामी झाली पण त्याच बरोबर समोरून समाजाची आणि तिच्या परविअरची बदनामी करण्यात आली आहे असे तक्रारीत म्हटले आहे. मात्र भाजपाच्या नेत्यांनी पोलीस स्थानकांमध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकत तपासात अडथळा निर्माण केला असल्याचं दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे