मंद्रुपमधील बंद अवस्थेत असलेले सौरऊर्जेचे व बाजारपेठ येथील एन.टी.पी.सीचे वीजेचे खांब विकून ग्रामपंचायत कामासाठी खर्ची घालावे-दयानंद ख्याडे.
🔸अशोक काळकुटे | संपादक
▪️महेश पवार | सोलापूर.
दक्षिण सोलापूर येथील मंद्रुपमध्ये अक्षरशः ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतच्या कारभारावर कंटाळून गावातील लाखो रुपये खर्च करून बसवलेले सौरऊर्जेचे दिवे व एनटीपीसीच्या माध्यमातून बसवलेले हायमास्ट दिवे विकण्यात यावे असा खोचक टोळा सत्ताधारी पँनलचे सदस्यच लगावले आहे. गेल्या दोन वर्षांपासून बाजारपेठ येथील बंद अवस्थेत असलेल्या हायमास्टला दुरुस्ती करण्यात यावी अशी अनेक वेळा सुचना करुनही प्रशासन त्याकडे टाळाटाळ करत आलेले आहे. व दोन लाख रुपये खर्च आहे एवढी रक्कम कोठून आणायचे असे प्रतिउत्तर मिळत असल्याने किमान हे हायमास्ट आणि प्रत्येक वार्डात लाख – लाख रुपये खर्च करुन बसवलेले हॉयमास्ट बंद अवस्थेत आहेत त्याकडे प्रशासन लक्ष देणार का?. शासनाकडून मंजूर करून आणलेल्या मोठ्या किमतीचे हायमास्ट बंद अवस्थेत ठेवल्याने त्याचा गावासाठी काही उपयोग नाही व वार्डातील प्रत्येक कचरा डबे जीर्ण अवस्थेत आहेत .त्यामध्ये कचरा घातल्यास ते जमीनीवर पडत आहे. त्यामुळे दुर्गंधी व कचऱ्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अश्या गोष्टीवर जर तोडगा निघत नसेल तर थेट विकण्यात यावे असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य दयानंद ख्याडे यांनी केले आहे.