राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी काही कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आणखी एका आघाडी सरकारच्या मंत्र्याविरोधात आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.
स्वाभिमानी संघटनेने काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्यावर आंदोलन केले होते. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांचा मोर्चा आघाडीचे दुसरे मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे वळवला आहे. स्वाभिमानीं संघटनेने सहकार मंत्र्यांच्या कारखान्याने FRP चा नियम मोडल्याचा आरोप करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ऊसाच्या एकरकमी FRPच्या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. एक रकमीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राजाराम बापू सह, साखर कारखाना येथे ठिय्या आंदोलन केल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा सातारा जिल्ह्याकडे वळवला आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र यावर अदयाप एकाही आघाडीच्या नेत्याने भाष्य केलेले नाही.