ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणखी एका मंत्र्यांच्या कारखान्यावर काढणार मोर्चा

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी काही कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आणखी एका आघाडी सरकारच्या मंत्र्याविरोधात आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.

स्वाभिमानी संघटनेने काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्यावर आंदोलन केले होते. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांचा मोर्चा आघाडीचे दुसरे मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे वळवला आहे. स्वाभिमानीं संघटनेने सहकार मंत्र्यांच्या कारखान्याने FRP चा नियम मोडल्याचा आरोप करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ऊसाच्या एकरकमी FRPच्या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. एक रकमीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राजाराम बापू सह, साखर कारखाना येथे ठिय्या आंदोलन केल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा सातारा जिल्ह्याकडे वळवला आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र यावर अदयाप एकाही आघाडीच्या नेत्याने भाष्य केलेले नाही.

error: Content is protected !!