नाशिक: राज्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्य सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहे. त्यात कोरोना रुग्णावर उपचारासाठी प्रभावी ठरलेली रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात जाणवू लागला आहे. तसेच त्याची मागणी सुद्धा मोठया प्रमाणात वाढलेली आहे.
रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या साठया संदर्भात भुजबळांना विचारले असता ते म्हणाले की, माझ्या घरात तर मी इंजेक्शनचा साठा केलेला नाही. कलेक्टरच्या घरातही साठा नाही आणि रेमडेसिव्हिर लस काय आमच्या घरी तयार होत नाही, असं सांगतानाच एखाद्या दुकानात जर साठा करण्यात आलेला असेल आणि मला कळलं तर तिथे जाऊन कारवाई करून इंजेक्शन रुग्णांसाठी उपलब्ध करून देत असतो असे बोलून दाखविले.
पुढे केंद्रावर निशाणा साधताना ते म्हणाले की, अमूकच लस कशाला हवी? मिळेल ती लस घेऊन देशातील जनतेला द्या ना, लसीचा अट्टाहास करू नका. अरे, माणूस जगला पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले. तसेच रेमडेसिव्हिर लस काय आमच्या घरी तयार होत नाही, असं धक्कादायक विधान भुजबळांनी केले आहे.