पोलीस मित्र परिवार रिसोड यांच्यावतीने अन्न दानाचे कार्य.
🔸अशोक काळकुटे | संपादक
▪️महेंद्रकुमार महाजन | रिसोड.
सध्या महाराष्ट्रामध्ये लॉक डाऊन ची परिस्थिती उद्भवलेली आहे अशातच राज्यावर कोरोना महामारी चे संकट करत असताना अशातच रिसोड शहरामध्ये गोरगरीब जनता उपाशीतापाशी राहूनही या उद्दिष्टाने रिसोड मध्ये कार्यरत असलेले पोलीस मित्र परिवार व मारुती महाराज मित्र मंडळ यांच्या वतीने 20 एप्रिल 2021 पासून अन्नधान्याचे कार्य सुरू आहे विशेष म्हणजे शहरांमधील व्यापारी वर्गांनी दिलेल्या दानातून येणाऱ्या जाणाऱ्या उत्तम प्रकारे जेवणाची व्यवस्था वाशिम नाका येथे करण्यात आली आहे दोन दिवसांमध्ये जवळपास पहिल्या दिवशी 80 ते 100 गोरगरीब जनतेने या अनुदानाचा लाभ घेतला आहे तसेच 21 एप्रिल रोजी जवळपास 200 लोकांपर्यंत लाभ घेतला आहे
विशेष म्हणजे या कार्यक्रमांमध्ये तीन प्रकारे अन्न वाटप जात आहे प्रथम वाशिम नाका येथे त्यानंतर एसटी महामंडळ येथे व ज्या ठिकाणी नागरिक उपाशी आहेत असा कोणाला त्या ठिकाणी पार्सल या माध्यमातून गोरगरीब जनतेपर्यंत अन्नदान पोहोचवल्या जातात या उपक्रमाचा रिसोड शहरामध्ये स्वागत होत आहे तसेच शहरामध्ये जाहीर व्यापारी वर्गांना दान देण्याची इच्छा असेल त्यांनी रिसोड पोलीस मित्र परिवारांना भेट द्यावे व सहकार्य करावे.