लसीकरण बंद असल्याने नागरिकांची नाराजी
🔸गणेश जाधव|संपादक
१ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली होती.केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात १ मे पासून १८ वर्षंवरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र लस वेळवर न पोहोचल्याने अद्यापही अनेक केंद्रावरील लसीकरण सुरूच झाले नसल्याचे चित्र आहे. सुखापुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील हीच अवस्था आहे. लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. लसीकरण बंद असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाला सुरुवात केली नसल्याची माहिती वैद्याकीय अधिकारी यांनी दिली. तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण देखील लस नसल्याने ठप्प झाले आहे. १८ वर्षांवरील नागरिकांची लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू आहे, लस उपलब्ध होताच नागरिकांना लस देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.