ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

राज्याभिषेक सोहळ्यासाठी निवडक मावळ्यांचा चमू रायगड कडे रवाना. युराञी संयोगिता राजेंनी दिला निरोप.

 

युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात गेल्या 15 वर्षांपासून 6 जून ला राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते. अखंड हिंदुस्तानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अनन्य साधारण महत्व आहे. या ऐतिहासिक घटनेला आजही तेवढेच महत्त्व आहे. कारण, अठरा पगड जाती बारा बलुतेदारांची मोठ बांधून महाराजांनी स्वराज्याला, सुराज्य बनवण्याची किमया साधली. ही प्रेरणादायी घटना लाखों शिवभक्तांना अखंड प्रेरणा देत असते.

छत्रपती शिवाजी महाराजांचेच तेरावे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती महाराजांनी पुन्हा या सोहळ्याला पूनर्वैभव प्राप्त करून दिले. आज हा सोहळा लोकोत्सव झाला असून, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त दरवर्षी रायगडावर येत असतात. परंतु गेल्या वर्षी आणि याही वर्षी कोरोना मुळे हा सोहळा मोजक्याच शिवभक्तांच्या उपस्थिती त साजरा केला जात आहे.

error: Content is protected !!