केज दि १७(प्रतिनिधी)
हिंदी भाषा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक समन्वयाची भाषा होती. हिंदी भाषेच्या माध्यमातूनच भारताच्या स्वातंत्र्य संग्रामास मोठी शक्ती मिळाल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ गौतम पाटील यांनी केले. ते सरस्वती महाविद्यालय येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा डॉ अलका डांगे तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य हनुमंत सौदागर यांची होती. यावेळी प्रा डॉ डांगे यांनी, हिंदी भाषा याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. तर प्राचार्य सौदागर यांनी हिंदी भाषेची उपयोगिता आणि आजच्या वर्तमानात तिचे संवर्धन आणि विकास करणे. हे एक आवाहन असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ लक्ष्मण तोंडाकुर यांनी तर आभार प्रा डॉ जे के जाधव यांनी मानले. यावेळी प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सोबत फोटो