धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,महाराष्ट्र दै.सूर्योदय
राज्यातल्या शाळा लवकरच सुरू होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड नंतर आदित्य ठाकरेंनीही दिले संकेत
मुंबई (प्रतिनिधी):-कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. मात्र शाळा सुरू करण्याबात वेगवेगळे मतप्रवाह होते. राज्यातील शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही शाळा सुरू करण्याबाबत भाष्य केलं होतं. आता शाळा सुरु करण्याबाबत आदित्य ठाकरेंनीही शाळा सुरू करण्याचे संकेत दिले आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत याविषयी माहिती दिली आहे. आज मुंबई महापालिका आणि कोविड टास्क फोर्ससोबत आदित्य ठाकरेंची बैठक पार पडली. या बैठकीत १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि राज्यातल्या करोना रुग्णसंख्येचा आढावा घेण्यात आला. आपल्या ट्वीटमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात, मुंबई महानगरपालिका आणि राज्य कोविड टास्क फोर्सच्या तज्ज्ञांसोबत आज आढावा बैठक झाली. आता कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याने आम्ही या बैठकीत आम्ही राज्यातल्या १५ ते १८ वर्षे वयोगटातल्या मुलांचं लसीकरण आणि शैक्षणिक संस्था पुन्हा खुल्या करणं कितपत सुरक्षित आहे, याचा आढावा घेतला.