ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

दोन महिन्यात नारायण राणे यांचे मंत्रिपद जाणार; वैभव नाईक यांचा दावा

 

काही दिवसांपासून विविध मुद्दयावरून कोकणातलं राजकारण चांगलंच तापल्याचे दिसत आहेत. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात असून विरोधककांकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आमदार आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असो किंवा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांची अटक असो. यावरुन कोकणात जोरदार राजकारण सुरु आहे. अशातच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांवर निशाणा साधला आहे. ईडीच्या कारवाईवरुनही नाईक यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे.

येत्या दोन महिन्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मंत्रिपद जाणार असल्याचा गौप्यस्फोट कुडाळ मालवण आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केलाय. आता पर्यंत इतरांचं राजकीय अस्तित्व ठरवणाऱ्या राणे यांचे राजकीय अस्तित्व भाजप ठवरणार आहे. भाजपला आता राणेंची राजकीय दृष्ट्या गरज नसल्याने त्यांना आता पदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचे सांगत वैभव नाईक यांनी राणेंना डिवचलं आहे. कणकवली येथे पत्रकार परिषदेत वैभव नाईक यांनी हे भाकित वर्तवले आहे.

तसेच निलेश राणेंच्या टीकेला प्रतिउत्तर देताना नाईक म्हणाले की, “नितेश राणे यांनी अगोदर आपल्या वडिलांना विचारावं की त्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी पक्ष का बदलला? त्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसचं पुढे काय झालं? वडिलांनी नेमका कोणता समजोता केला ? हे अगोदर जनतेसमोर आणावं आणि मग इतरांना उपदेश करावा,” अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे.

error: Content is protected !!