रामपुरीत घराला आग दिडशे क्किंटल कापुस जळुन खाक
गेवराई प्रतिनीधी;-घराला आग लागुन संसार उपयोगी साहित्यासह १५०क्विटल कापुस जळुन खाक झाल्याची घटना घडली असुन शेतकरी कुटुंबाचे लाखो रु नुकसान झाले आहे
या घटने संबंधी सविस्तर माहिती अशी की गेवराई तालुक्यातील रामपुरी गावात दि ३ एप्रिल बुधवार पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे संस्सार उपयोगी वस्तु सह घरात साठवुन ठेवलेला १५० क्विंटल कापुस जळुन खाक झाल्याची घटना घडली आहे
रामपुरी येथील शेतकरी ‘अंकुश जगदिश म्हस्के, यांनी शेतातील कापुस भाव वाढीसाठी घरामधे साठवुन ठेवला होता परंतु दि ३,एप्रिल बुधवार पहाटे अचानक कापसाने पेट घेतल्यामुळे घराला आग लागली आगीत संस्सार उपयोगी वस्तु व १५० क्विंटल कापुस जळुन खाक झाला
आग आटोक्यात आणण्यासाठी गावकऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले नंतर गेवराई नगर परिषद अग्नीशामक दलाला बोलावण्यात आले हि आग विझवण्यास अग्नीशामक दलाला यश आले आगीत शेतकर्यांनी वर्षभर पिकविलेला माल पुर्णपणे जळुन खाक झाला आहे त्यामुळे लाखो रु नुकसान झाले आहे
आग शॉटसर्कीट,मुळे लागली असल्याची चर्चा नागरीकात होती