धनंजय कुलकर्णी -उपसंपादक दै.महाराष्ट्र सूर्योदय
धारूर आगारातून उन्हाळी सुट्टीत प्रवाशांसाठी एसटी महामंडळांनी केली जादा बसेसची व्यवस्था
किल्ले धारूर(प्रतिनिधी):- धारूर आगारातून प्रवाशांसाठी आज सोमवार (दि १५) पासून जादा बस सुटणार असल्याची माहिती आगार प्रमुख नवनाथ चौरे यांनी दिली आहे .
या मध्ये लांब पल्ल्याच्या गाड्याचाही समावेश करण्यात आला आहे .खालील वेळेनुसार या बस धावणार आहेत
धारूर मुंबई कुर्ला -सकाळी ६. ३० वा ,
धारूर शिवाजी नगर आळंदी संध्या -७.००.वा.
,धारूर चौसाळा पुणे -संध्या ८. ००वा,
धारूर येवता पुणे संध्या -८. ३०वा,
तर धारूर लातूर छ.संभाजी नगर साठी सकाळी.६.०० वाजल्या पासून दर अर्ध्या तासाला सकाळी ८.३० वा . पर्यंत सुरु राहतील व माजलगाव व केज साठी हि जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत या मुळे प्रवाशांना आता बसस्थानकात जास्त वेळ ताटकळत बसण्याची वेळ येणार नाही याची खबरदारी घेण्यात आल्याचे दिसून येते या मुळे प्रवाशांना हि उन्हापासून होणार त्रास कमी होईल व वेळात प्रवास सुखकर होईल या दृष्टीने विचार करून या जादा बस सोडण्यात आल्याची माहिती धारूर आगार प्रमुख नवनाथ चौरे यांनी दिली आहे त्याच्या केलेल्या निर्णय व्यवस्थेमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे व सर्व सामान्य जनतेने याचे स्वागत केले आहे