ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !

दहिगांव -ने परिसरातील देवळाणेत ५५ मेंंढ्या मुत्युमुखी

दहिगांव -ने परिसरातील देवळाणेत ५५ मेंंढ्या मुत्युमुखी

घटनास्थळाची वन विभागाकडून पाहणी

अहवाल आल्यानंतर घटनेची उकल होणार – अरूण साबळे वन परिक्षेत्र अधिकारी

शेवगाव;-शेवगाव तालुक्यातील दहिगांव – ने परिसरातील अशोक क्षीरसागर यांच्या मालकीच्या ५५ मेंढ्या मुत्युमुखी पडल्याची माहिती स्थानिकांनी वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून पंचनामा करून मृत मेंढ्यांची उत्तर तपासणीसाठी फॉरेशी लॅबकडे पाठवण्यात आले. अहवाल आल्यानंतर मेंढ्या मुत्युमुखी पडल्याचे कारण स्पष्ट होईल.
सदर घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान घटली. घटना घडल्या नंतर स्थानिक रहिवाशांनी शुक्रवारी सकाळी वन विभागाला कळविली. नंतर वन विभागाचे पाथर्डी वन परिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला व पुढील तपासासाठी साठी घटनास्थळाचे मेंढ्यांचे रिपोर्ट फाॅरेंशी लॅबकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. सदर अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे वन परिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे यांनी सांगितले.
सदर घटनेमध्ये ५५ मेंढ्या मुत्युमुखी पडल्याचे दिसून आले. आजच्या बाजारभावा नुसार संबंधित शेतकऱ्याचे सुमारे ६ ते ७ लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
संबंधित घटना स्थळाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर पशुसंवर्धन अधिकारी तसेच वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. या घटनेने दहिगांव – ने परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडून गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

error: Content is protected !!