ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ही निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई- आ.संदीप क्षीरसागर

ही निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई- आ.संदीप क्षीरसागर
शहरातील मोमीनपुरा, सय्यद नगर भागात कॉर्नर सभा
बीड दि.१ (प्रतिनिधी):- ही लोकसभेची निवडणूक केवळ निवडणुक नसून आपल्या अस्तित्वाची आत्मसन्मानाची निवडणूक असून ही आपल्याला जिंकावीच लागेल असे मत आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केले. बीड शहरातील मोमीनपुरा व सय्यद नगर भागात झालेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते.
          बुधवार (दि.१) रोजी बीड शहरातील मोमीनपुरा भागातील मासूम नगर व शाहू नगर भागातील सय्यद नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आ.संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत कॉर्नर सभा झाली. या बैठकीत ही निवडणूक म्हणजे आता आपल्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरलेली आहे. इथे जिंकलोत तर आपले अस्तित्व आणि आपला आत्मसन्मान राहील अन्यथा येणारा काळ अवघड परिस्थितीचा आहे. त्यामुळे मतदान हे विचारासाठी योगदान असून ते आपण योग्य ठिकाणीच दिले पाहिजे. असे मत आ.क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान या बैठकीस महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!