सक्तीची वीजबील वसुली थांबवा; खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा उद्रेक-कुलदीप करपे.
🔸अशोक काळकुटे | संपादक
▪️केज | प्रतिनिधी.
दि.१६ मागील १५ दिवसांपासून केज तालुक्यातील शेतकऱ्यांकडून महावीतरण च्या कर्मचाऱ्यांमार्फत कृषी पंपाचे थकीत वीज बील सक्तीने वसुली चालू असून,अचानकपणे कुठल्याही प्रकारची प्रकारची नोटीस न देता महावितरण ने थकीत कृषीपंपाचे वीज कनेक्शन तोडली असल्याने शेतकऱ्यांचे पिके वाळून जात आहेत .कुठल्याही प्रकारची सूचना अथवा लेखी नोटीस न देता बेकायदेशीरपणे वीज कनेक्शन तोडणे शेतकऱ्यांवर ही बाब अन्यायकारक आहे.
या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे ,जिल्हाउपाध्यक्ष प्रमोद पांचाळ, युवा शेतकरी नेते फेरोज खान पठाण ,शाखा अध्यक्ष सुग्रीव करपे यांनी आज दि.16 (फेब्रुवारी) मंगळवारी उपकार्यकारी अभियंता ,केज यांना लेखी निवेदन दिले. सध्या चालू असलेले सक्तीची वसुली तत्काळ थांबवावी व खंडीत केलेले विज कनेक्शन तात्काळ पूर्ववत करावेत अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयावर तीव्र उद्रेक करण्यात येईल ,बेमुदत आक्रमक आंदोलन छेडले जाईल याची कृपया नोंद घ्यावी.परिणामी निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी म्हणून आपली राहील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिला आहे.