ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

सक्तीची वीजबील वसुली थांबवा; खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा उद्रेक-कुलदीप करपे.

सक्तीची वीजबील वसुली थांबवा; खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा उद्रेक-कुलदीप करपे.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️केज | प्रतिनिधी.
दि.१६ मागील १५ दिवसांपासून केज तालुक्यातील शेतकऱ्यांकडून महावीतरण च्या कर्मचाऱ्यांमार्फत कृषी पंपाचे थकीत वीज बील सक्तीने वसुली चालू असून,अचानकपणे कुठल्याही प्रकारची प्रकारची नोटीस न देता महावितरण ने थकीत कृषीपंपाचे वीज कनेक्शन तोडली असल्याने शेतकऱ्यांचे पिके वाळून जात आहेत .कुठल्याही प्रकारची सूचना अथवा लेखी नोटीस न देता बेकायदेशीरपणे वीज कनेक्शन तोडणे शेतकऱ्यांवर ही बाब अन्यायकारक आहे.
या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे ,जिल्हाउपाध्यक्ष प्रमोद पांचाळ, युवा शेतकरी नेते फेरोज खान पठाण ,शाखा अध्यक्ष सुग्रीव करपे यांनी आज दि.16 (फेब्रुवारी) मंगळवारी उपकार्यकारी अभियंता ,केज यांना लेखी निवेदन दिले. सध्या चालू असलेले सक्तीची वसुली तत्काळ थांबवावी व खंडीत केलेले विज कनेक्शन तात्काळ पूर्ववत करावेत अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयावर तीव्र उद्रेक करण्यात येईल ,बेमुदत आक्रमक आंदोलन छेडले जाईल याची कृपया नोंद घ्यावी.परिणामी निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी म्हणून आपली राहील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिला आहे.

error: Content is protected !!