ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

संजय राठोड अजूनही मंत्रीपदावरच? जनतेच्या डोळ्यात धुळफेक सुरु असल्याचा चित्रा वाघ यांचा आरोप.

संजय राठोड अजूनही मंत्रीपदावरच? जनतेच्या डोळ्यात धुळफेक सुरु असल्याचा चित्रा वाघ यांचा आरोप.

🔸अशोक काळकुटेह| संपादक

पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यानंतर अखेर शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना वनमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागले. ०३ दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. मात्र, संजय राठोड हे अद्यापही मंत्रिपदावर आहेत, असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलंय. कारण, राठोड यांनी राजीनामा दिला असला तर तो मुख्यमंत्र्यांनी अद्याप राज्यपालांकडे पाठवला नाही, असा दावा वाघ यांनी केला आहे.

“मा. मुख्यमंत्रीजी, संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन ०३ दिवस झाले पण तो राज्यपालांकडे पाठवलेला नाही. राजीनामा राज्यपालांकडे जाऊन मंजूर होत नाही तोवर संजय राठोड आजही मंत्री आहेत. ही राज्यातील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणं आहे. या संदर्भात “वाण नाही पण गुण लागला” हे तुमच्याबाबत होऊ देऊ नका” असे ट्वीट संजय राठोड यांनी केलं आहे.

error: Content is protected !!