मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची बैठक संपन्न ; समाजाला फक्त छत्रपतींकडुनच अपेक्षा.
🔸अशोक काळकुटे | संपादक
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सध्या राज्याभर खासदार संभाजीराजे छत्रपती हे फिरत आहेत. दरम्यान त्यांनी आता आरक्षणासाठी मोठा लढा उभारला आहे. “समाज बोलला आम्ही बोललो आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला” असे आवाहन लोकप्रतिनिधींना करत खासदार संभाजीराजे छत्रपतींनी पहिले आंदोलन कोल्हापूर येथे छेडले यामध्ये सर्व पक्षाचे जाती धर्माचे लोकप्रतिनिधी सहभागी झाले आणि समाजाच्या आरक्षणासाठीच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. आता मराठा समाजाला फक्त आणि फक्त खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडूनच अपेक्षा उरल्या आहेत. बाकीच्या राजकीय नेत्यांचे आश्वासनं आणि आंदोलनं हे फक्त राजकारण्यांचा राजकारणाचा भाग उरला आहे. याच लढ्यातील दुसरे आंदोलन आज नाशिक येथे पार पडले या आंदोलनात देखील मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. यामुळे राज्य,केंद्र सरकारला पुन्हा एकदा छत्रपतींनी घाम फोडला आहे. यामुळे आता राज्य आणि केंद्र सरकारला मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार करावा लागणार आहे. आज नाशिक येथील मूक आंदोलन पार पडल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची एक बैठक देखील पार पडली आहे. या बैठकीत विविध प्रश्नावर सर्व समन्वयकांचे मत जाणून घेतले. यावेळी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती आणि राज्य समन्वयकांची उपस्थिती होती.
या बैठकीत मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक तथा राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर नाना काळकुटे यांनी देखील आपले मत मांडले आहे.